Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Thursday, November 02, 2006

The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद

हादाशी नो गेन- The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद.

(1)
गेन नाकाओका- आपल्या गोष्टीचा नायक, हिरोशिमात जन्मला आणि वाढला. तो प्राथमिक शाळेत जाऊ लागला त्या सुमारास, जपानची ब्रिटन आणि अमेरिकेविरुद्ध लढाई चालू होती.
जपानच्या युद्धातील पराभवाच्या जरा आधीच्या काळात ह्या कहाणीची सुरवात होते.

गेन हा ७ वर्षाचा खट्याळ,आनंदी मुलगा. नवनवीन खोड्या शोधून काढण्यात वाकबगार. त्यासाठी,धाकट्या भावाला-शिन्जीला त्याच्याबद्दल खूप आदर होता. रोज शाळेतून गेन घरी आल्यावर, दोघजणं एकमेकांशी अंधार पडेस्तोवर खेळायचे. त्यांचे वडील लाखेच्या कामातील कुशल कारागीर होते. स्वत:च्या घरातील छोट्याशा workshop मध्ये लाकडावर लाखेची चित्र काढून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत. आई घरकामात, कुटुंबाची काळजी घेण्यात आणि वडिलांना मदत करण्यात व्यग्र असे. मोठा भाऊ -कोजी माध्यमिक शाळेत शिकत असे. शाळेत जाण्याऐवजी तो आणि त्याचे मित्र आताशा, घरापसून लांबच्या, हिरोशिमाच्या जवळच्या दुस-या गावात, एका दारुगोळा बनवायच्या फॅक्ट्रीत काम करत असत. सरकारी धोरणानुसार, जपानला युद्ध जिंकायला मदत म्हणुन, विद्यार्थ्यांना अशा कारखान्यात काम करावं लागत असे- त्यांची ईच्छा असो वा नसो! शाळेच्या ईतर विद्यार्थ्यांसोबत अकिराला (२ नंबरच्या भावाला), जिथे बॉम्बहल्ल्याची कमी शक्यता होती अशा दूरच्या गावात जाऊन रहावं लागलं. निघताना, भरलेल्या डोळ्यांनी, अकिरा आईला "मला जायचे नाही" म्हणत होता.तिस-या ईयत्तेतल्या मुलांपासून evacuation ची सुरवात झाली होती आणि अकिरा तिस-या ईयत्तेत होता. एकुलती एक बहिण 'ऐको', ५व्या ईयत्तेत असली, तरी तब्येतीने अशक्त असल्यामुळे घरी आईवडिलांकडे थांबू शकली होती. गेनचं कुटुंब ह्या सात जणांच होतं. युद्धाच्या सगळ्या समस्यांना, होता होईल तो एकमेकांना सांभाळुन हे कुंटुंब तोंड देत होतं- पण युद्ध संपेपर्यंत कुटुंबातले सगळेच काही जिवंत राहिले नाहीत...

एक दिवस, आईने गेनला तिच्या पोटाला कान लावून ऐकायला सांगितलं. आईच्या पोटात काहीतरी जोरदार हालचाल होत होती. "आपल्या घरी लवकरच नवीन बाळ येणार आहे आता "- आई हसत हसत म्हणाली.
“माझं छोटा भाऊ किंवा छोटी बहीण- “ गेन किंचाळत म्हणाला.
"आणि बाळ लाथ मारतय.."
दोन मोठ्या मुलांच्या वियोगामुळे तसं सगळं घर उदास असायच. पण आता गेनच्या आनंदातिशयानी आख्ख्या घरात धीर आणला, आशा आणली.

गेन आणि शिन साठी अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे- कुटुंबाच्या गव्हाच्या शेतात जाऊन बाबांना मदत करणे.गव्हाच्या कापणीची ते दोघं अगदी आतुरतेने वाट बघायचे कारण त्यांना खात्री होती की आपण ह्यापासून नुडल्स किंवा ब्रेड बनवू शकू. त्यांची एकच ईच्छा होती , एका दिवसासाठी का होईना, पण पोट तुडुंब भरलेलं असावं! रोजच्या जेवणात, अक्षरश: भाताची शित मोजता येतील एवढी पाणीदार कांजी असायची. त्या काळ्या दिवसात जपानातील ईतर लोकांप्रमाणेच, ते नेहमीच भुकेले असायचे.

(2)
बाबा कधी कधी निराश व्हायचे, कारण त्यांना कळत होतं की जपान एक दुस्तर युद्ध लढत आहे. सुदूर दक्षिणेकडिल बेटांवर तैनात केले गेलेले शिपाई तण, उंदीर, साप आणि जे मिळेल ते खात होते. तरिही उपासमारीने मरत होते. काही आजारी पडले, तर काहींच्या बॉम्बहल्ल्यात ठिक-या ऊडाल्या. आपल्या कुटुंबाला सुखसमाधानात रहायला मिळावं म्हणुन बाबा आतुरतेने युद्ध संपायची वाट बघत होते. त्यांच्या तीव्र ईच्छेला न जुमानता, युद्धाची धुमश्चक्रि दिवसेंदिवस वाढतच होती.

१९४५ मधील एप्रिलच्या पहिल्या दिवशी, अमेरिकेची फौज ओकिनावात(जपानच्या सर्वात दूरच्या तटबंदीवर) डेरेदखल झाली. घनघोर लढाईने ओकिनावाच्या रहिवास्यांना घेरलं आणि जवजवळ विध्वंसाच्या टोकांपर्यंत नेउन ठेवलं.ओकिनावाची हिरवीगार धरती आणि निळ्याशार समुद्र ,रक्ताच्या लाल रंगाने माखले. दुष्मनांचे हवाई दलं जवळजवळ रोज mainland जपानकडे जाऊ लागले. शहरांवर बॉम्ब टाकून, आगीचे डोंब उसळ्वू लागले आणि रातोरात शहरं बेचिराख करु लागले. आगीच्या लोळात अगणित लोकं जळुन मेले. रेडिओ आणि वर्तमानपत्र मात्र, जपान सगळ्या लढाया जिंकत असल्याचे खोटे वृत्तांत देत हो्ते. ज्या नेत्यांनी युद्धात लढ्ण्याचा निर्णय घेतला होता ते ठासून सांगत होते " जपान हा पवित्र देश आहे. आपण युद्ध जिंकणारच ". नेतेमंडळी धादांत खोटं बोलत होती आणि युद्ध थांबवायला नकार देत होती. वृत्तांत ऐकणा-यांचा मात्र, शेवटी जपान युद्ध जिंकणारच, असा समज होत होता. लोकं रोज तकलादू बांबूच्या काठ्याकामट्यांनी शत्रूला कसं मारायच- हे शिकायसाठी कवायती करत होते. शेवट्च्या माणसापर्यंत लढण्याचे संकल्प सोडत होते.
एक दिवस, बाबा जरा जास्तच साके पिऊन या भाला कवायतीत गेले. त्याचा, त्या कवायतीच्या प्रमुखाला खूप राग आला. तो स्थानिक समितीचा अध्यक्ष होता. " तुम्हाला आपल्या अतिमहत्वाच्या युद्धाबाबत गांभिर्य नाही. दारु पिऊन कवायतीला यायची तुमची हिम्मतच कशी झाली ? अशा पवित्राने तुम्ही अमेरीकेच्या शिपायांचा पराभव कसा करणार? तुमच्यात योग्य ती भावना नाही. "
"अध्यक्षसाहेब, अशा माणसाला काढूनच टाकलं पाहिजे.. असा माणुस म्हणजे गद्दारासारखाच- "असे भाला हाताळायला शिकवणारा एक निवृत्त म्हातारा शिपाईगडि म्हणाला. "अगदी बरोबर"- अध्यक्षाने मान डोलवली..

आता बाबांनाही राग आला.. ते म्हणाले "गप्प बसा. मी निव्व्ळ दारु पिऊन आलो म्हणुन मी गद्दार ठरत नाही. शिवाय ह्या बांबूच्या भाल्यांनी अमेरिकनांचा पराभव करायची आशा बाळगणे हे मुर्खपणाचे आहे. सुरवातीपासून अंतापर्यंत हे युद्ध ही एक चुक आहे."
मग बाबांनी भाला फेकून दिला आणि ते घरी गेले. अध्यक्ष आणि त्याचे गडि, सगळे त्यांच्यामागून "गद्दार, गद्दार "च्या आरोळ्या देत होते. युद्धाला विरोध करणा-यांना सरसकट गद्दार म्हणलं जायच. त्यांची अट्टल गुन्हेगारांहून जरा कमी अवहेलना केली जायची.

(3)
गेन्- ऐक मी काय सांगतोय ते"- बाबा म्हणाले. "यूद्धानी माणसं, प्राणी, झाडं आणि घरं सगळच उद्ध्वस्त होतं. दु:ख आणि यातना या शिवाय युद्ध आपल्यासाठी काहीही मागे ठेवत नाही.जपाननी युद्ध थांबवून शांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे."

ते काय म्हणत होते ते गेनला समजणे अवघड होतं. तरीपण बाबांच बरोबर आहे याची गेनला खात्री होती.
पण शेजारपाजारचे मात्र रस्त्यावरुन जाता येता गेन आणि त्याच्या भावाकडे तुछ्चतेने बघत आपल्या मुलांना कुजबुजत सांगत:" त्यांचे वडिल गद्दार आहेत. मुलं ही बापाच्याच वळणावर जाणार. त्यांच्यापासून दूर रहा."

एक दिवस गेन, ऐको आणि शिनजी वडिलांनी लाखेच्या गिलावा दिलेल्या लाकडी वस्तू ठेल्यावर टाकून, ठेला खेचत घाऊकविक्रेत्याकडे नेत होते. मिळालेल्या पैशातून, काळ्याबाजारातून तांदूळ विकत घ्यायचा होता. नदीकाठच्या रस्त्याला लागले, तसे त्यांच्यावर दगडफेक होऊ लागली. दगडफेक करणारी मुलं म्हणजे अध्यक्षांचे चिरंजीव ( ryukichI )र्युकिची आणि त्याचे टारगट मित्र. त्यांनी ह्या तिन मुलांचा रस्ता अडवला आणि म्हणाले "गद्दार कुठले! तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही आता". मग त्यांनी ठेला हिसकावून घेतला आणि नदीत ढकलून दिला. तो माल नदीत भिजला आणि वाया गेला.

गेनच्या तळपायाची आग मस्तकात गेली . "बाबा गद्दार नाही. तू खोटारडा आहेस" क्षणार्धात, तो र्युकिचीच्या अंगावर धाऊन गेला आणि त्याच्या बोटाला कडकडुन चावला- डोक्यात धोंडा बसूनही तो बोट सोडेचना.
र्युकिचीने भोकाड पसरलं आणि रक्त ठिबकणारे आपले बोट घेऊन तो पळून गेला. गेन ती मारामारी जिंकला खरा, पण त्याला त्या यशाचा आनंद घेता आला नाही. ऐको आणि शिन्जी अपमानाचे अश्रू ढाळत होते.
अचानक, गेनला बाबांचा नेहमीचा उपदेश आठवला- "ग़ेन- धिर धर बाळा. तू गव्हाच्या ओंब्यांसारखं सशक्त असलं पाहीजेस. गहू किती वेळा पायदळी तुडवला जातो म्हणून पुन्हा पुन्हा ऊठुन उभा राहू शकतो."

मुलांनी, भिजून तरंगत असलेला सगळा माल नदीतून गोळा केला आणि घरी घेऊन आले. पण आईबाबांना त्यांनी घडलेली घटना पूर्ण सांगीतली नाही. फक्त माल नदीत पडल्याचं सांगीतलं.

क्रमश:

1 Comments:

  • At 3:30 am, Anonymous Anonymous said…

    हितगुजवर ही गोष्ट वाचली तेव्हाच तिथेच प्रतिक्रिया द्यायचं मनांत होतं पण म्हटलं ब्लॉगवरच देऊ या. वाह! पुढे काय होणार याची उत्कंठा लागून राहिली आहे, येऊ दे पुढचं...
    आणि हो तुम्ही तर जपान almost पाहिलेलं दिसतंय. क्यूशूलाही नक्की जाऊन या. तुमचं वर्णन वाचायला खूप आवडेल.

     

Post a Comment

<< Home